Skip to content

राणी अहिल्यादेवी व सांगलीकरांचे ऋणानूबंध

सांगली म्हणलं की प्रथम डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कृष्णामाईचा घाट, आयर्विन पुल आणि कृष्णा तीरावर वसलेले संपूर्ण सांगलीकरांच्या जिव्हाळ्याच ठिकाण म्हणजे श्री गणपती मंदिर. पटवर्धन सरकार यांच्या काळात बांधलेले हे मंदिर सांगलीकरांच्या मनात एक वेगळेच घर करून आहे.

जेवढे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे तितकेच त्याचा इतिहास ही रंजक असाच आहे. इस सन १८११ मध्ये थोरले चिंतामणराव म्हणजेच आप्पासाहेब पटवर्धन यांनी मंदिर बांधण्यास सुरवात केली व इ.स. १८४३ मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले.

परंतु हे मंदिर पूर्ण होण्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे. त्याला कारण असे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे रेवाडेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले होते. अतिशय सुंदर असे हे मंदिर अहिल्या देवी यांनी बांधले असून तेथे अहिल्यादेवी होळकर यांनी अन्नछत्र देखील चालु केले होते.

Ahilyabai Holkar android App

आज ही हे मंदिर सुस्थितीमध्ये असून पाहण्यासारखे आहे. तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरापैकी काही संगमरवरी दगड शिल्लक होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पश्चात त्या काही शिल्लक दगडांपैकी एक दगड श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांनी मिळवला व स्थानिक पाथरवट भिमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी त्या दगडापासून सुबक अश्या गणपती व रिध्दि सिध्दी च्या मूर्ती बनवून घेतल्या.

संगमरवरी दगडापासून बनवलेल्या गणपती व रिद्धी-सिद्धीच्या मुर्त्या

आज ज्या सुबक व सुंदर मूर्ती आपण पाहतो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची देण आहे असे म्हणलं तरी काही वावगे ठरणार नाही.

संदर्भ
1.सांगली संस्थान चे संस्थापक थोरले अप्पासाहेब यांच चरित्र – गोविंद कुंटे
2.तन्वी श्यामा – वि का राजवाडे
3.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
मधुकर हाक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *