Skip to content

Indore State – इंदौर स्टेट

राणी अहिल्यादेवी होळकर

लोकमाता, राजमाता, विरांगणा, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे वर्ष टिकून आहेत. टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगात यावं, इकडे लक्ष दिले. त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वाना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे. अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदुःखाने व्याकूळ होणार मन, त्यांना लाभलं होतं.
Read more…